मी पणाला उरून
आठवणींमध्ये झुरून
स्वाभिमानाला सावरून
पुन्हा जगावे त्या ठिकाणी....
ठेच मज लागी जिवा
अंतरीचा रोजचाच गारवा
जुन्या क्षणांना आठवूनि
पुन्हा जगावे त्या ठिकाणी.....
हिंदोळ्याच्या ओसाड रानात
मखमली चाहूल येते मनात
परी नको आता कोणी म्हणुनी
पुन्हा जगावे त्या ठिकाणी.....
नाममात्र उरला असेल
हे पण नाही वळुनी पाहिले
अपेक्षाभंग केला ज्यांनी ,म्हणुनी
पुन्हा जगावे त्या ठिकाणी....
मीही तेवढाच उंच उडेल
माझ्या जबाबदाऱ्या एकहाती सावडेल
स्वप्नपूर्तीच्या त्या दिशेने मी एकटाच उडेल ,म्हणुनी
पुन्हा जगावे त्या ठिकाणी.....
ऋषिकेश पवार
टीप खास जिवलग मित्र दीपक परीट यांच्या आग्रहास्तव बनवलेली कविता🥰❤️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा