गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

मैदान

मैदान
तुझं मैदान म्हणत म्हणत 
सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं
माझ्या शेताच्या प्रश्नाचं 
आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं

सरकार काय करतंय ते 
उघड्या डोळ्यांनी सगळेच बगताय 
माझा गट तर एकच आहे 
जिथे निष्ठा आईबापा पुढं कधी गेलीच नाय

तुमची शक्ती दाखवण्याच्यासाठी 
त्या पोलिसांचे का हाल करता 
तुम्ही ओढाल ओ ताशेरे एकमेकांवर 
मग एवढ्या कोट्यवधींची उधळपट्टी कोणाच्या जीवावर भरता

असो सामान्यांना येड्यात काढायला 
तुमच्यापेक्षा जमतंय व्हय कोणाला 
जनता काय येडी आहे 
तुमचं चालू द्या यावच लागतंय म्हण ठाण्याला
मी हे गर्दीत बोललो तर 
वरून एकजण ओरडत होता 
"जीव जाउस्तर मतदान फक्त बानाला." 

आपण फक्त trp वाढवू  ,
जाणारा जातोयच की राणाला,
मतदान तर सगळेच करतोय की मानाला
एकेदिवशी सगळे सोबतच लागू की दानाला .🤗

ऋषिकेश नानासाहेब पवार (लांडे) बामणी 
धाराशिव

शेतकरी

शेतकरी

काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल पण
झाले असेल सगळ्यांचे पाहुनी 
सनसामान्यांच्या जिवनातले दररोजचे अडथळे कधी जातील वाहुनी.

तुमच्या-आमच्या जनसामान्यांच्या
प्रश्नांचं कोणाला पडलयं खरं
 एका नेत्याच्या पोराचं 
आणि गलिच्छ राजकारणाच्या ढोराचं
 आपल्यासनी मनापासून कौतुक हाय बरं..

गोगलगाय पण येचुन झाली सोयाबीन माझी नासुन गेली. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची बातमी लाचारांनी अजून पण बंद नाय केली......

तुझ्या गेलसालच्या पिकाचा हमीभाव सरकारचा घोळ मिटुस्तवर येत नाय वरं 
मग लाखाचं  बी बियाणं मातीत इस्कटायला तुझचं धाडीस कस काय झाल रं..

तु सावकाराच्या नजरेला नजर मिळवुनी
नडलास काय नि मेलास काय
एका रातीत मालक बदलनारी माणसं आपल्यासाठी झगडतील असा माझा बि भरम हाय..

जग थांबल, सरकार बदलल
पण ह्यो शेतकरी नावाचा माथ्याला लावलेला टिळा
 तुलाच मिरवाचाय 
तुलाच मिरवाचाय

त्यामुळ माझी माय
येतील आपल बी सोन्याचं दिस बगायं
तु फकस्त धीरानं रहायं
तु फकस्त धीरानं रहायं



ऋषिकेश नानानासाहेब पवार 
मु पो बामणी
ता. जि. धाराशिव 9657695783

सोयाबीन

पावसानं केलाय नुस्ता राडा आणि सोयाबीन ला लावलाय घोडा, 
पेरणी झाली सोयाबीन आलं डूबाला, पण पावसामुळं तावच आला गवताला
सोयाबीन वर आली गोगल गाय, औषध टाकून सुद्धा गेली नाय, 
 
दररोजच पाऊस सुर्य काय बघनां,
                   आणि 
गवताच्या वर काय सोयाबीन दिसनां, कश्या तरी शेंगा झाल्या निब्बर, 
पण अजून भाव वाढल्याची आली नाही खबर, सोयाबीन आलं काढाला, रोजांन माणसं काय मिळंना
काय करावं तेच कळंना, 
तंड्यावरचा आणला गुत्तेदार,
त्यानं काढलं आपलं हत्यार
आणि म्हणलां द्या 
1 कोंबडं आणि 5 हजार, 
पुन्हा यांच्या साठी विकावं लागलं गोठ्यातलं वाघार, कसं तरी सोयाबीन काडून घेतलं, आणि इकडं चांगलचं रान पेटलं, भरडून न्हेलं सोयाबीन अडतीला, आणि भावचं आला गळतीला,अडतीवाला म्हणतोय यात किती माती आणि खडा, शेतकरी म्हणतोय जरा हिशोबानं लावा थोडा,

 सावकार पाठवतोय अर्ज 
आणि कस फेडावं त्याच कर्ज



जिवलग मित्र विनोद बलभीम माळी यांनी रचलेली कविता

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...